सातारा जिल्ह्यातील वाघेरी (ता. कराड) येथील विजय व सुरेश भीमराव काशीद या भावंडांनी कष्ट, प्रामाणिक प्रयत्न, आधुनिक तंत्रज्ञान व मुक्त गोठा पद्धतीचा वापर या बाबींच्या जोरावर दुग्ध व्यवसायात दखलपात्र मजल मारली आहे. त्यांची ही धडपड शेतीतील तरुण पिढीला प्रेरणादायक आहे. अमोल जाधव
शेतीची पार्श्वभूमी कराड शहरापासून उत्तरेस साधारण तेरा किलोमीटर अंतरावर वाघेरी गाव आहे. गावच्या डोंगरकुशीत काशीद यांची वडिलार्जित साडेतीन एकर शेती आहे. सतरा गुंठ्यांत घासगवत, 10 गुंठ्यांत मका, 35 गुंठे क्षेत्रात कडवळ, वीस गुंठे क्षेत्रात उसाचे पीक आहे. उर्वरित क्षेत्रात कडधान्याची पिके घेतात. शेतालगत तीन गुंठ्यांत सुसज्ज असा मुक्त संचार पद्धतीचा गोठा आहे. गाईंना फिरण्यासाठी मुक्त मैदान, स्वतंत्र पाण्याची सोय, निवाऱ्यासाठी शेड, तसेच खाद्य उपयोगी साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र खोलीही तेथे आहे. होल्स्टिन फ्रिजीयन जातीच्या 11 गाई व पाच कालवडी आहेत. सर्व जनावरे सशक्त आहेत.
व्यवसायाला सुरवात विजय काशीद यांचे शिक्षण दहावी झाले. त्यांनी सुरवातीला नोकरीसाठी खूप धडपड केली. मात्र यश मिळाले नाही. सन 2007 पूर्वी त्यांनी तीन वर्षे चालक (ड्रायव्हर) म्हणून नोकरी केली. नोकरीऐवजी शेती व्यवसायच चांगल्या प्रकारे करण्याच्या इराद्याने त्यांनी 2007 ला दुग्ध व्यवसाय करण्याचा मनोदय आखला. सुरवातीला भांडवल नव्हते. मात्र कष्ट करण्याची तयारी असल्याने दूध खरेदीदाराकडून पन्नास टक्के रक्कम उचलस्वरूपी व उर्वरित रक्कम स्वतःकडील गुंतवून 27 हजार पाचशे रुपये खर्चून कराडमधील जनावरांच्या बाजारातून गाई घेतल्या. त्यांचे संगोपन सुरू केल्यानंतर उत्पादित दूध विक्रीतून सुमारे चार ते पाच महिन्यांत खरेदीदाराकडील उचल फिटली. त्यानंतर त्याच पद्धतीने दुसरी गाय खरेदी केली. अशा पद्धतीने पुढे चार गाईंचे सुसूत्रपणे संगोपन केले. त्यांना बंधू सुरेश यांचीही बारावीच्या शिक्षणानंतर साथ मिळू लागली.
गोठा व्यवस्थापन चोख ठेवले दोघा भावंडांनी चिकाटीने कष्ट करत काही महिन्यांतच अंगावरील उचलीचा बोजा कमी केला. तेथून पुढे रोखीने गाई खरेदी केल्या. सुरवातीला पाच गाईंचा गोठा बांधीव होता. गाईंना स्तनदाह व जखमा होऊ लागल्याने बैठकीसाठी मॅटची सोय केली. गाईंना मोकळ्या वातावरणात हिंडता यावे यासाठी दोन वर्षांपासून मुक्त संचार पद्धतीचा गोठा बांधला. सुमारे 25 फूट रुंद व 85 फूट लांबीच्या आवारात गाईंना मुक्तपणे फिरण्याची सोय आहे. उर्वरित 15 फूट रुंद व 85 फूट लांबीच्या क्षेत्रफळात शेड आहे. गोठा उभारणीसाठी सुमारे तीन लाख 75 हजार रुपये खर्च आला. यात दूध खरेदीदाराकडून उचल घेऊन टप्प्याटप्प्याने काम पूर्ण केले. दूध काढणीवेळी गाई शेडमध्ये येतात. तेथे त्यांना वैरणीची कुट्टी व खाद्य देतात. दूध काढणीनंतर गाई मुक्त संचार करतात. मुक्त गोठ्यामुळे शेण काढणी, पाणी पाजणे, गोठ्याच्या स्वच्छतेकामी लागणारे 40 टक्के श्रम कमी झाले आहेत. त्याचबरोबर व्यवस्थापन खर्चात बचत घडली.
दुग्धोत्पादन काशीद यांच्याकडील व्यायलेली गाय चार महिन्यांपर्यंत प्रति दिन 25 लिटर व गाभण कालावधीतील गाय चार ते सात महिन्यांच्या कालावधीपर्यंत 16 ते 17 लिटर दूध देते. प्रतिदिन एकूण सरासरी 110 लिटर दूध उत्पादित होते. प्रति लिटर सरासरी वीस रुपयांपर्यंत दर मिळतो. यातून दरमहा 66 हजारांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यातील सुमारे पन्नास ते साठ टक्के व्यवस्थापन खर्च होतो. मुक्त संचार पद्धतीमुळे रोगराई निवारणासाठी होणाऱ्या खर्चात 70 ते 80 टक्क्यापर्यंत बचत झाली आहे. खाद्य, सुकी वैरण, टंचाईवेळी आणलेल्या ओल्या वैरणीसाठीही खर्च होतो.
दोन वर्षांपासून पैदाशीच्या वासरांचे संगोपन केले आहे. तसेच तीन ते चार वेत झालेल्या गाईंची विक्रीही केली आहे. त्यापासून उत्पन्न जोडले आहे. वडील भीमराव काशीद, आई सौ. कमल यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन व आत्मविश्वास मिळतो. पुढील कालावधीत प्रति दिन 225 ते 250 लिटर उत्पादन करण्याचे नियोजन आहे.
दूध खरेदीदार शाश्वत असल्यास हा व्यवसाय फायद्यात राहतो. असे काशीद बंधूंचे म्हणणे आहे. त्यामुळे शाश्वत खरेदीदाराकडेच ते दूध विक्री करतात. गोठ्यात दूध काढणी यंत्र आहे. प्रति चार मिनिटास 14 लिटर दूध काढणी क्षमता असणारे हे यंत्र आहे. भारनियमनावेळी पर्यायी व्यवस्था आहे. कष्ट व प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करण्याकडे त्यांचा कल असतो. सूत्रबद्धपणे व्यवस्थापन सांभाळल्याने विना थांबा दर्जेदार दूध उत्पादन घेणे त्यांना शक्य झाले आहे.
अनुभवी शेतकऱ्यांकडील गोठ्यांना भेटी देऊन व्यवसायातील बरे-वाईट अनुभव जाणून घेतल्यानंतर त्यानुसार व्यवसाय सांभाळल्यामुळेही प्रगती साधता आली. पहाटे पाच ते सात व सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत गोठ्यातील व्यवस्थापन, तसेच वैरण काढणीची कामे काशीद बंधू स्वतः सांभाळतात. त्यातून मजुरीचा खर्च कमी केला आहे.
गाईंना चाऱ्याबरोबर गोळी खाद्य, सरकी पेंड आदींचा वापर होतो. मुक्त गोठा पद्धत असल्याने रोगराईचे प्रमाण नगण्य आहे. जनावरांत कृत्रीम रेतन तंत्र वापरण्याच्या दृष्टीने पशुवैद्यक गोठ्यावर येतात.
नैसर्गिक अपघाताने गाईंचा मृत्यू झाल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी गाईंचे विमा संरक्षणही घेतले आहे.
दूध विक्री व खाद्यदराच्या हिशेबाने व्यवस्थापन नियंत्रित ठेवतात.
साडेतीन एकर शेती व्यवस्थापनाकडेही लक्ष दिले जाते. ऊस, घासगवत, मका, कडवळ व कडधान्ये ही पिके घेतात. शेणाचे उत्कृष्ट पद्धतीचे भुकटीस्वरूपी खत तयार होते. ते पिकांसाठी वापरले जाते.
नोकरीच्या मागे न लागता एखाद्या कठीण प्रसंगालाही धाडसाने सामोरे जात व्यवसाय कायमस्वरूपी टिकविण्याच्या हेतूने काशीद बंधूंची धडपड सुरू आहे. काहीही झाले तरी भांडवल उशाला असल्याने ते डगमगत नाहीत.
कष्टाची आणखी बाजू सांगायची तर काशीद यांच्या गोठ्याकडे येणारा मार्ग शेतातून आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या वाहनांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अशावेळी काशीद बंधू सायकलीला दुधाच्या किटल्या अडकवून अर्धा किलोमीटर अंतर दूध वाहतूक करतात. त्याच पद्धतीने खाद्याचीही वाहतूक करतात. दरमहा दोन ट्रेलर शेणखत मिळते. वर्षाकाठी पंधरा ट्रेलर शेणखत विकून त्यामधील रकमेतून सुकी वैरण विकत आणतात. उर्वरित शेणखत शेतात वापरतात.
संपर्क - विजय काशीद, 9011921272
सुरेश काशीद, 9921572634
शेतीची पार्श्वभूमी कराड शहरापासून उत्तरेस साधारण तेरा किलोमीटर अंतरावर वाघेरी गाव आहे. गावच्या डोंगरकुशीत काशीद यांची वडिलार्जित साडेतीन एकर शेती आहे. सतरा गुंठ्यांत घासगवत, 10 गुंठ्यांत मका, 35 गुंठे क्षेत्रात कडवळ, वीस गुंठे क्षेत्रात उसाचे पीक आहे. उर्वरित क्षेत्रात कडधान्याची पिके घेतात. शेतालगत तीन गुंठ्यांत सुसज्ज असा मुक्त संचार पद्धतीचा गोठा आहे. गाईंना फिरण्यासाठी मुक्त मैदान, स्वतंत्र पाण्याची सोय, निवाऱ्यासाठी शेड, तसेच खाद्य उपयोगी साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र खोलीही तेथे आहे. होल्स्टिन फ्रिजीयन जातीच्या 11 गाई व पाच कालवडी आहेत. सर्व जनावरे सशक्त आहेत.
व्यवसायाला सुरवात विजय काशीद यांचे शिक्षण दहावी झाले. त्यांनी सुरवातीला नोकरीसाठी खूप धडपड केली. मात्र यश मिळाले नाही. सन 2007 पूर्वी त्यांनी तीन वर्षे चालक (ड्रायव्हर) म्हणून नोकरी केली. नोकरीऐवजी शेती व्यवसायच चांगल्या प्रकारे करण्याच्या इराद्याने त्यांनी 2007 ला दुग्ध व्यवसाय करण्याचा मनोदय आखला. सुरवातीला भांडवल नव्हते. मात्र कष्ट करण्याची तयारी असल्याने दूध खरेदीदाराकडून पन्नास टक्के रक्कम उचलस्वरूपी व उर्वरित रक्कम स्वतःकडील गुंतवून 27 हजार पाचशे रुपये खर्चून कराडमधील जनावरांच्या बाजारातून गाई घेतल्या. त्यांचे संगोपन सुरू केल्यानंतर उत्पादित दूध विक्रीतून सुमारे चार ते पाच महिन्यांत खरेदीदाराकडील उचल फिटली. त्यानंतर त्याच पद्धतीने दुसरी गाय खरेदी केली. अशा पद्धतीने पुढे चार गाईंचे सुसूत्रपणे संगोपन केले. त्यांना बंधू सुरेश यांचीही बारावीच्या शिक्षणानंतर साथ मिळू लागली.
गोठा व्यवस्थापन चोख ठेवले दोघा भावंडांनी चिकाटीने कष्ट करत काही महिन्यांतच अंगावरील उचलीचा बोजा कमी केला. तेथून पुढे रोखीने गाई खरेदी केल्या. सुरवातीला पाच गाईंचा गोठा बांधीव होता. गाईंना स्तनदाह व जखमा होऊ लागल्याने बैठकीसाठी मॅटची सोय केली. गाईंना मोकळ्या वातावरणात हिंडता यावे यासाठी दोन वर्षांपासून मुक्त संचार पद्धतीचा गोठा बांधला. सुमारे 25 फूट रुंद व 85 फूट लांबीच्या आवारात गाईंना मुक्तपणे फिरण्याची सोय आहे. उर्वरित 15 फूट रुंद व 85 फूट लांबीच्या क्षेत्रफळात शेड आहे. गोठा उभारणीसाठी सुमारे तीन लाख 75 हजार रुपये खर्च आला. यात दूध खरेदीदाराकडून उचल घेऊन टप्प्याटप्प्याने काम पूर्ण केले. दूध काढणीवेळी गाई शेडमध्ये येतात. तेथे त्यांना वैरणीची कुट्टी व खाद्य देतात. दूध काढणीनंतर गाई मुक्त संचार करतात. मुक्त गोठ्यामुळे शेण काढणी, पाणी पाजणे, गोठ्याच्या स्वच्छतेकामी लागणारे 40 टक्के श्रम कमी झाले आहेत. त्याचबरोबर व्यवस्थापन खर्चात बचत घडली.
दुग्धोत्पादन काशीद यांच्याकडील व्यायलेली गाय चार महिन्यांपर्यंत प्रति दिन 25 लिटर व गाभण कालावधीतील गाय चार ते सात महिन्यांच्या कालावधीपर्यंत 16 ते 17 लिटर दूध देते. प्रतिदिन एकूण सरासरी 110 लिटर दूध उत्पादित होते. प्रति लिटर सरासरी वीस रुपयांपर्यंत दर मिळतो. यातून दरमहा 66 हजारांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यातील सुमारे पन्नास ते साठ टक्के व्यवस्थापन खर्च होतो. मुक्त संचार पद्धतीमुळे रोगराई निवारणासाठी होणाऱ्या खर्चात 70 ते 80 टक्क्यापर्यंत बचत झाली आहे. खाद्य, सुकी वैरण, टंचाईवेळी आणलेल्या ओल्या वैरणीसाठीही खर्च होतो.
दोन वर्षांपासून पैदाशीच्या वासरांचे संगोपन केले आहे. तसेच तीन ते चार वेत झालेल्या गाईंची विक्रीही केली आहे. त्यापासून उत्पन्न जोडले आहे. वडील भीमराव काशीद, आई सौ. कमल यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन व आत्मविश्वास मिळतो. पुढील कालावधीत प्रति दिन 225 ते 250 लिटर उत्पादन करण्याचे नियोजन आहे.
दूध खरेदीदार शाश्वत असल्यास हा व्यवसाय फायद्यात राहतो. असे काशीद बंधूंचे म्हणणे आहे. त्यामुळे शाश्वत खरेदीदाराकडेच ते दूध विक्री करतात. गोठ्यात दूध काढणी यंत्र आहे. प्रति चार मिनिटास 14 लिटर दूध काढणी क्षमता असणारे हे यंत्र आहे. भारनियमनावेळी पर्यायी व्यवस्था आहे. कष्ट व प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करण्याकडे त्यांचा कल असतो. सूत्रबद्धपणे व्यवस्थापन सांभाळल्याने विना थांबा दर्जेदार दूध उत्पादन घेणे त्यांना शक्य झाले आहे.
अनुभवी शेतकऱ्यांकडील गोठ्यांना भेटी देऊन व्यवसायातील बरे-वाईट अनुभव जाणून घेतल्यानंतर त्यानुसार व्यवसाय सांभाळल्यामुळेही प्रगती साधता आली. पहाटे पाच ते सात व सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत गोठ्यातील व्यवस्थापन, तसेच वैरण काढणीची कामे काशीद बंधू स्वतः सांभाळतात. त्यातून मजुरीचा खर्च कमी केला आहे.
गाईंना चाऱ्याबरोबर गोळी खाद्य, सरकी पेंड आदींचा वापर होतो. मुक्त गोठा पद्धत असल्याने रोगराईचे प्रमाण नगण्य आहे. जनावरांत कृत्रीम रेतन तंत्र वापरण्याच्या दृष्टीने पशुवैद्यक गोठ्यावर येतात.
नैसर्गिक अपघाताने गाईंचा मृत्यू झाल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी गाईंचे विमा संरक्षणही घेतले आहे.
दूध विक्री व खाद्यदराच्या हिशेबाने व्यवस्थापन नियंत्रित ठेवतात.
साडेतीन एकर शेती व्यवस्थापनाकडेही लक्ष दिले जाते. ऊस, घासगवत, मका, कडवळ व कडधान्ये ही पिके घेतात. शेणाचे उत्कृष्ट पद्धतीचे भुकटीस्वरूपी खत तयार होते. ते पिकांसाठी वापरले जाते.
नोकरीच्या मागे न लागता एखाद्या कठीण प्रसंगालाही धाडसाने सामोरे जात व्यवसाय कायमस्वरूपी टिकविण्याच्या हेतूने काशीद बंधूंची धडपड सुरू आहे. काहीही झाले तरी भांडवल उशाला असल्याने ते डगमगत नाहीत.
कष्टाची आणखी बाजू सांगायची तर काशीद यांच्या गोठ्याकडे येणारा मार्ग शेतातून आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या वाहनांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अशावेळी काशीद बंधू सायकलीला दुधाच्या किटल्या अडकवून अर्धा किलोमीटर अंतर दूध वाहतूक करतात. त्याच पद्धतीने खाद्याचीही वाहतूक करतात. दरमहा दोन ट्रेलर शेणखत मिळते. वर्षाकाठी पंधरा ट्रेलर शेणखत विकून त्यामधील रकमेतून सुकी वैरण विकत आणतात. उर्वरित शेणखत शेतात वापरतात.
संपर्क - विजय काशीद, 9011921272
सुरेश काशीद, 9921572634